अन्न पूर्णब्रह्म अन् यज्ञकर्मही
एचके लर्निंग अँड एनएए : देह सक्रिय असण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आहारातून मिळते. जीवात्मा प्राणाच्या रुपात देहात स्थित असतो. प्राण म्हणजेच परमात्म्याचा अंश. या जिवात्म्याची काळजी घेण्यासाठी मन, बुध्दी आणि इंद्रिय कार्यरत असतात. यात मन हे सात्विक असावे लागते. सात्विक मन असण्यासाठी आहारही सात्विक असायला हवा. बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवून आपला स्वभावगुण सात्विक ठेवायला हवा. अन्न ग्रहण करताना आपण प्राणाचे चिंतन करत प्राणाय स्वाहा म्हणत जेवण करायला हवे. मुखातून अन्न जठराग्नीपर्यंत कसे पोहचत आहे हे आंतरिक नेत्राने पहावे. म्हणजे अन्न ग्रहण करताना ध्यानस्त होत हे कर्म होईल. परिणामी आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि ध्येयप्राप्ती पूर्णत्वास येऊन सुख, शांती, समाधान आणि समृध्दी मिळेल. यज्ञ समजून अन्नसेवन : अन्न हे पूर्णब्रह्म आहे. केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर यज्ञ समजून अन्नसेवन करायचे असते. अन्न कर्तव्य म्हणून खावे. पवित्र वातावरणात बसून, यज्ञकुंडात जशा सावकाश आहुत्या दिल्या जातात तसे सावकाश अन्न खावे. यज्ञाच्या वेळी आहुत्या देण्याआधी अग्नीचे आवाहन केलेले असते, तसे जेवायच्या आधी भूक