पोस्ट्स

अन्न पूर्णब्रह्म अन् यज्ञकर्मही

इमेज
एचके लर्निंग अँड एनएए : देह सक्रिय असण्यासाठी ऊर्जेची आवश्यकता असते. ही ऊर्जा आहारातून मिळते. जीवात्मा प्राणाच्या रुपात देहात स्थित असतो. प्राण म्हणजेच परमात्म्याचा अंश. या जिवात्म्याची काळजी घेण्यासाठी मन, बुध्दी आणि इंद्रिय कार्यरत असतात. यात मन हे सात्विक असावे लागते. सात्विक मन असण्यासाठी आहारही सात्विक असायला हवा. बुद्धीने मनावर नियंत्रण ठेवून आपला स्वभावगुण सात्विक ठेवायला हवा. अन्न ग्रहण करताना आपण प्राणाचे चिंतन करत प्राणाय स्वाहा म्हणत जेवण करायला हवे. मुखातून अन्न जठराग्नीपर्यंत कसे पोहचत आहे हे आंतरिक नेत्राने पहावे. म्हणजे अन्न ग्रहण करताना ध्यानस्त होत हे कर्म होईल. परिणामी आयुष्यात सकारात्मकता वाढेल आणि ध्येयप्राप्ती पूर्णत्वास येऊन सुख, शांती, समाधान आणि समृध्दी मिळेल. यज्ञ समजून अन्नसेवन : अन्न हे पूर्णब्रह्म आहे. केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर यज्ञ समजून अन्नसेवन करायचे असते. अन्न कर्तव्य म्हणून खावे. पवित्र वातावरणात बसून, यज्ञकुंडात जशा सावकाश आहुत्या दिल्या जातात तसे सावकाश अन्न खावे. यज्ञाच्या वेळी आहुत्या देण्याआधी अग्नीचे आवाहन केलेले असते, तसे जेवायच्या आधी भूक

श्री स्वामी चरित्र अध्याय 21

इमेज
श्री स्वामी चरित्र सारामृत एकविंशोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ निर्मिली सुंदर देवमंदिरे । चौक बैठका नाना प्रकारे । कळस ठेवल्यावरी सारे । पूर्ण झाली म्हणती त्या ॥१॥ स्वामीचरित्र सारामृत । झाले वीस अध्यायापर्यंत । करोनी माझे मुख निमित्त । वदले श्रीस्वामीराज ॥२॥ आता कळसाध्याय एकविसावा । कृपा करोनी वदवावा । हा ग्रंथ संपूर्ण करावा । भक्तजनांकारणे ॥३॥ संपवावा अवतार आता । ऐसे मनामाजी येता । जडदेह त्यागोनी तत्त्वता । गेले स्वस्थानी यतिराज ॥४॥ शके अठराशे पूर्ण । संवत्सर बहुधान्य । मास चैत्र पक्ष कृष्ण । त्रयोदशी मंगळवार ॥५॥ दिवस गेला तीन प्रहर । चतुर्थ प्रहराचा अवसर । चित्त करोनी एकाग्र । निमग्न झाले निजरुपी ॥६॥ षट्चक्राते भेदोन । ब्रह्मरंध्रा छेदोन । आत्मज्योत निघाली पूर्ण । हृदयामधुनी तेधवा ॥७॥ जवळ होते सेवेकरी । त्यांच्या दुःख झाले अंतरी । शोक करिता नानापरी । तो वर्णिला न जाय ॥८॥ अक्कलकोटीचे जन समस्त । दुःखे करून आक्रंदन । तो वृतान्त वर्णिता ग्रंथ । वाढेल समुद्रसा ॥९॥ असो स्वामींच्या लीला । जना सन्मार्ग दाविला । उद्धरिले जडमुढाला । तो महिमा कोण वर्णी ॥१०॥ कोकणांत समुद्रतीरी । प्रसिद्ध जिल्हा रत

श्री स्वामी चरित्र अध्याय 20

इमेज
श्री स्वामी चरित्र सारामृत विशंतितमोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ जयजयाजी करुणाकरा । जयजयाजी यतिवरा । भक्तजन संतापहरा । सर्वेश्वरा गुरुराया ॥१॥ लीलावेषधारी दत्ता । सर्वसाक्षी अनंता । विमलरुपा गुरुनाथा । परब्रह्म सनातना ॥२॥ तुझे चरित्र अगाध । केवी वर्णू मी मतिमंद । परी घेतला असे छंद । पूर्ण केला पाहिजे ॥३॥ तुझ्या गुणांचे वर्णन । करिता भागे सहस्त्रवदन । निगमागमासहि जाण । नसे पार लागला ॥४॥ तुझे वर्णावया चरित्र । तुजसम कवी पाहिजेत । तरी अल्पमतीने अत्यल्प । गुणानुवाद का न गावे ॥५॥ वर्णिता समर्थांचे गुण । नाना दोष होती दहन । सांगता ऐकता पावन । वक्ता श्रोता दोघेहि ॥६॥ अक्कलकोटी वास केला । जना दाखविल्या अनंत लिला । उद्धरिले कैक पाप्यांना । अद़्भुत चरित्र स्वामींचे ॥७॥ असो कोणे एके दिवशी । इच्छा धरोनी मानसी । गृहस्थ एक दर्शनासी । समर्थांच्या पातला ॥८॥ करोनियां श्रींची स्तुती । माथा ठेविला चरणावरती । तेव्हा समर्थ त्याते वदती । हास्यवदने करोनी ॥९॥ फकिराते देई खाना । तेणे पुरतील सर्व कामना । पक्वान्ने करोनी नाना । यथेच्छ भोजन देईजे ॥१०॥ गृहस्थे आज्ञा म्हणोन । केली नाना पक्वान्ने । फकीर बोलाविले पाच जण

श्री स्वामी चरित्र अध्याय 19

इमेज
श्री स्वामी चरित्र सारामृत एकोनविंशोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ एकाग्रचित्ते करिता श्रवण । तेणे होय दिव्य ज्ञान । त्या ज्ञाने परमार्थसाधन । पंथ सुलभ होतसे ॥१॥ सच्चरित्रे श्रवण करिता । परमानंद होय चित्ता । ओळखू ये सत्यासत्यता । परमार्थ प्रपंचाची ॥२॥ या नरदेहा येवोन । काय करावे आपण । जेणे होईल सुगम । दुस्तर हा भवपंथ ॥३॥ ज्यांसी वानिती भले । सज्जन ज्या मार्गे गेले । सर्व दुःखमुक्त झाले । तो पंथ धरावा ॥४॥ बोलणे असो हे आता । वर्णू पुढे स्वामीचरिता । अत्यादरे श्रवण करिता । सर्वार्थ पाविजे निश्चये ॥५॥ प्रसिद्ध आळंदी क्षेत्री । नामे नृसिंहसरस्वती । जयांची सर्वत्र ख्याती । अजरामर राहिली ॥६॥ कृष्णातटाकी क्षेत्रे पवित्र । ती देखिली त्यांनी समस्त । नाना योगाभ्यासी बहुत । महासाधू देखिले ॥७॥ करावे हठयोगसाधन । ऐसी इच्छा बहुत दिन । नाना स्थाने फिरोन । शोध करिती गुरुचा ॥८॥ जपी तपी संन्यासी । देखिले अनेक तापसी । जे सदा अरण्यवासी । योगाभ्यासी बैसले ॥९॥ एक सूर्यमंडळ विलोकिती । एक पंचाग्निसाधन करिती । एक वायू भक्षिताती । मौन धरिती कितीएक ॥१०॥ एक झाले दिगंबर । एकी केला उर्ध्व कर । एक घालिती नमस्कार । एक ध्यान

श्री स्वामी चरित्र अध्याय 18

इमेज
श्री स्वामी चरित्र सारामृत अष्टदशोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ स्वामीसुताच्या गादीवर । कोण नेमावा अधिकारी । ऐसा प्रश्न सेवेकरी । करिताती समर्थांते ॥१॥ तेव्हा बोलले समर्थ । सेवेकरी असती सांप्रत । परी एकही मजला त्यांत । योग्य कोणी दिसेना ॥२॥ जेव्हा येईल आमुच्या मानसी । त्या समयी मोर पांखरासी । अधिकारी नेमू गादीसी । चिंता तुम्ही न करावी ॥३॥ मोर पांखरा मोर पांखरा । समर्थ म्हणती वेळोवेळा । रात्रंदिन तोची चाळा । मोठमोठ्याने ओरडती ॥४॥ आमुची पाऱ्याची वीट । जतन करावी नीट । वारंवार म्हणती समर्थ । काकूबाईलागोनी ॥५॥ लपवून ठेविले विटेसी । ती दिली पाहिजे आम्हांसी । याचा अर्थ कवणासी । स्पष्ट काही कळेना ॥६॥ असो स्वामीसुताचा भ्राता । कोकणांत राहत होता । स्वामीसुत मृत्यु पावता । वर्तमान कळले त्या ॥७॥ तो केवळ अज्ञान । दादा तयांचे अभिधान । त्याचे शरीरी असमाधान । कृश होत चालला ॥८॥ काकूबाईने तयासी । आणविले आपणापासी । एके दिवशी समर्थांसी । दादाप्रती दाखविले ॥९॥ बाळ चालले वाळोनी । यासी अमृतदृष्टीने पाहोनी । निरोगी करावे जी स्वामी । बाई विनवी समर्थांते ॥१०॥ समर्थ बोलले बाईसी । चार वेळा जेवू घाला यासी । आरोग्य होई

श्री स्वामी चरित्र अध्याय 17

इमेज
श्री स्वामी चरित्र सारामृत सप्तदशोध्याय  ॥ श्री गणेशाय नमः ॥ मागील अध्यायी कथा सुंदर । प्रख्यात जे मुंबई शहर । तेथे येऊनी स्वामीसुत । मठ स्थापिती समर्थांचा ॥१॥ षड्विकार जिंकिले । संसार त्यागिले । रात्रंदिन रत झाले । स्वामी भजनी सुखाने ॥२॥ स्वात्मसुखी तल्लीन वृत्ती । तेणे हरली संस्मृती । कवणाची नाही भीती । सदा चित्ती आनंद ॥३॥ स्वामीनामाचे भजन । त्यांचिया चरित्राचे कीर्तन । त्याहूनी व्यवसाय अन्य । स्वामीसुत नेणती ॥४॥ संसाराते सोडोन । बैसले गोसावी होवोन । हे पाहूनी कित्येकजण । हासताती तयाते ॥५॥ परी त्याचा विषाद चित्ती । स्वामीसुत न मानिती । अंगी बाणली पूर्ण विरक्ति । विषयासक्ति नसेची ॥६॥ स्वामीसुताची जननी । काकूबाई नामे करोनी । तिने हे वृत्त ऐकोनी । दुःख केले अनिवार ॥७॥ मोहावर्ती सापडले । मायावश जे झाले । त्यांसी प्रपंचावेगळे । गोड काही न लागेची ॥८॥ पुत्रवात्सल्यकरोनी पाही । शोक करीत काकूबाई । मुंबईत लवलाही । सुताजवळी पातल्या ॥९॥ गोसावी निजसुता पाहोनी । वक्षःस्थळ घेती बडवोनी । अंग टाकियले धरणी । बहुत आक्रोश मांडिला ॥१०॥ निजमातेचा शोक पाहोन । दुःखित झाले अंतःकरण । तियेलागी सावरून । धरिले स

श्री स्वामी चरित्र अध्याय 16

इमेज
श्री स्वामी चरित्र सारामृत षोडशोध्याय ॥ श्री गणेशाय नमः ॥ भक्तजन तारणार्थ । यतिरुपे श्रीदत्त । भूवरी प्रगट होत । अक्कलकोटी वास केला ॥१॥ जे जे झाले त्यांचे भक्त । त्यात श्रेष्ठ स्वामीसुत । ऐकता त्यांचे चरित्र । महादोष जातील ॥२॥ प्रसिद्ध मुंबई शहरांत । हरीभाऊ नामे विख्यात । आनंदे होते नांदत । निर्वाह करीत नोकरीने ॥३॥ कोकणप्रांती राजापूर । तालुक्यात इटिया गाव सुंदर । हरीभाऊ तेथील राहणार । जात मराठे तयांची ॥४॥ ते खोत त्या गावचे । होते संपन्न पूर्वीचे । त्याच गांवी तयांचे । माता-बंधू राहती ॥५॥ मुंबईत तयांचे मित्र । ब्राह्मण उपनाव पंडित । ते करिता व्यापार त्यात । तोटा आला तयांसी ॥६॥ एके समया पंडितांनी । स्वामीकिर्ती ऐकिली कानी । तेव्हा भाव धरोनी मनी । नवस केला स्वामीते ॥७॥ जरी आठ दिवसांत । मी होईन कर्जमुक्त । तरी दर्शना त्वरीत । अक्कलकोटी येईन ॥८॥ यासी सात दिवस झाले । काही अनुभवा न आले । तो नवल एक वर्तले । ऐका चित्त देउनि ॥९॥ हरीभाऊ आणि त्यांचे मित्र । अफूचा व्यापार करीता त्यात । आपणा नुकसान सत्य । येईल ऐसे वाटले ॥१०॥ त्यांनी काढिली एक युक्ती । बोलावुनी पंडिताप्रती । सर्व वर्तमान त्या सांगती